राजेंद्र प्रसाद
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती / From Wikipedia, the free encyclopedia
डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय (जन्म : ३ डिसेंबर १८८४; - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.[2]
जलद तथ्य पंतप्रधान, उपराष्ट्रपती ...
डॉ. राजेंद्रप्रसाद | |
भारताचे १ ले राष्ट्रपती | |
कार्यकाळ जानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३ इ.स. १९६२[1] | |
पंतप्रधान | जवाहरलाल नेहरू |
---|---|
उपराष्ट्रपती | सर्वेपल्ली राधाकृष्णन (१९५२-१९६२) |
मागील | पदनिर्मिती |
पुढील | सर्वपल्ली राधाकृष्णन |
कार्यकाळ आॅगस्ट १५, इ.स. १९४७ – जानेवारी १४, इ.स. १९४८ | |
पंतप्रधान | जवाहरलाल नेहरू |
मागील | पदनिर्मिती |
पुढील | जयरामदास दौलतराम |
भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष | |
कार्यकाळ डिसेंबर ९, इ.स. १९४६ – जानेवारी २४, इ.स. १९५० | |
पंतप्रधान | जवाहरलाल नेहरू |
मागील | सच्चिदानंद सिन्हा |
पुढील | पद रद्द केले |
जन्म | डिसेंबर ३, इ.स. १८८४ जेरादेई, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत (आजचा बिहार) |
मृत्यू | फेब्रुवारी २८, इ.स. १९६३ पाटणा |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | राजवंशी देवी |
व्यवसाय | वकिली |
पुरस्कार | भारतरत्न (१९६२) |
बंद करा