कल्की अवतार
भगवान विष्णु यांचा शेवटचा अवतार / From Wikipedia, the free encyclopedia
कल्की अवतार (संस्कृत: कल्कि अवतार;IAST: Kalkī Āvatār ) हा हिंदु धर्मातील देवता विष्णूचा दशावतारापैकी १० वा अवतार आणि भविष्यातील अवतार मानला जातो. वैष्णव ब्रह्मांडशास्त्रानुसार, हा अंतहीन चक्र असलेल्या चार कालखंडापैकी शेवटचा असून कलियुगाच्या अंतानंतर येणारा हिंदू देव विष्णूचा दहावा अवतार आहे. जेव्हा कल्की देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर स्वार होऊन, तेजस्वी तलवारांनी सर्व पापी अधर्म दुष्ट लोकांचा विनाश करेल तेव्हा सतयुग प्रारंभ होईल.[1] पौराणिक कथांनुसार, कलियुगात पाप वाढल्यावर, जगातील अंधार व अधर्म, दुष्टांचा नाश करण्यासाठी, धर्म स्थापना करण्यासाठी कल्की अवतार प्रकट होईल. कलियुगात कलि राक्षसाचा विनाश करेल. [2][3] कल्की अवताराला "निष्कलंक भगवान "या नावाने देखील ओळखला जाईल.[4] हा अवतार ६४ कलांनी पूर्ण असलेला 'निष्कलंक अवतार' आहे.[1]
कल्की अवतार | |
विष्णूचा दहावा अवतार - इत्यादींची अधिपती देवता | |
मराठी | कल्कि |
संस्कृत | कल्किः |
निवासस्थान | शम्भल |
लोक | वैकुंठ |
वाहन | अश्व |
शस्त्र | सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, कमळ, शंख , अग्नि तलवार |
वडील | विष्णूयश |
आई | सुमति |
पत्नी | लक्ष्मी पद्मा |
अन्य नावे/ नामांतरे | कल्किन
केशव, नारायण, माधव, गोपाळ, गोविंद, हरि, जनार्दन, अच्युत, पुरुषोत्तम, पद्मनाभ. |
या देवतेचे अवतार | मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, |
नामोल्लेख | श्रीमद भागवत, विष्णू पुराण कल्कि पुराण |
कल्की हा अवतार कलियुग व सतयुगच्या संधिकालामध्ये होईल[5][6];सर्वप्रथम महाप्रलय [7] येऊन कलियुगाच्या अंतानंतर सत्ययुग (सतयुग) सुरू होईल [8]
कलियुगाचा कालावधी ४,३२,००० वर्षे आहे, विद्वानांच्या संशोधनानुसार, इसवी सन पू्र्व ३,१०२ या वर्षी कलियुग सुरू झाले.[8]
त्याच्या पौराणिक कथांची तुलना इतर धर्मातील मशीहा,कयामत, फ्रैशोकरेटी(फारशी) आणि मैत्रेय ,संकल्पनेशी केली आहे.[1][9]