जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग
भारतीय रेल्वेचा मार्ग / From Wikipedia, the free encyclopedia
साचा:जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग
जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग | |||
---|---|---|---|
प्रदेश | जम्मू आणि काश्मीर | ||
मालक | भारतीय रेल्वे | ||
चालक | उत्तर रेल्वे | ||
तांत्रिक माहिती | |||
मार्गाची लांबी | ३४५ किमी (२१४ मैल) | ||
ट्रॅकची संख्या | १ | ||
गेज | १६७६ मिमी ब्रॉड गेज | ||
विद्युतीकरण | नाही | ||
|
जम्मू-बारामुल्ला रेल्वेमार्ग (उर्दू:کشمیر ریلوے) हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात बांधला जात असलेला रेल्वेमार्ग प्रकल्प आहे. याचे अधिकृत नाव जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला लोहमार्ग असून ह्याद्वारे काश्मीर खोरे उर्वरित भारतासोबत रेल्वेमार्गाने जोडले जाईल.
भारत-पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळील बारामुल्ला शहरामध्ये सुरू होणारा हा मार्ग श्रीनगर, अनंतनाग, उधमपूर इत्यादी शहरांमधून वाट काढत जम्मू येथे संपतो. जम्मूमधील जम्मू तावी स्थानकापर्यंत उत्तर रेल्वेचे जाळे विकसित असल्यामुळे काश्मीर रेल्वेमार्गामुळे काश्मीरसाठी भारताच्या सर्व भागांमधून रेल्वे प्रवास सुलभ होईल.
एकूण ३४५ किमी लांबीच्या ह्या मार्गावरील बारामुल्ला ते बनिहाल हा १३० किमी लांबीचा व जम्मू ते कटरा हा ७८ किमी लांबीचा अशा दोन स्वतंत्र पट्ट्यांचे काम पूर्ण झाले असून ह्या मार्गांवर वाहतूक सुरू आहे. बनिहाल ते कटरा ह्या १३० किमी लांबीच्या सर्वात दुर्गम पट्ट्याचे बांधकाम सुरू असून ते २०२० मध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे. ह्या मार्गावरील काम अत्यंत कठीण असून येथे एकूण ६२ पूल व अनेक बोगदे अपेक्षित आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी ४ जुलै २०१४ रोजी कटरा ते नवी दिल्ली श्री शक्ती एक्सप्रेस ह्या गाडीचे उद्घाटन केले. कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक ह्या स्थानकामुळे वैष्णोदेवीला भेट देणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवास सुलभ झाला आहे.