१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
१८५७ चा राष्ट्रीय उठाव - भारत / From Wikipedia, the free encyclopedia
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७ चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दिनांक | १० मे १८५७ - २० जून १८५८ |
---|---|
स्थान | उ.भारतीय मैदानी प्रदेश, बंगाल |
परिणती | ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपुष्टात शिपायांचा उठाव दडपला गेला मुघल साम्राज्य व मराठा साम्राज्यांचा शेवट ब्रिटीश राणीचा अंमल सुरू |
युद्धमान पक्ष | |
---|---|
ईस्ट इंडिया कंपनीचे बंडखोर शिपाई मुघल ग्वाल्हेर संस्थान झांंशी संस्थान मराठा साम्राज्य |
ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश साम्राज्य भारतातील युरोपीय नागरिक २१ भारतीय संस्थाने नेपाळचे साम्राज्य |
सेनापती | |
बहादूरशहा दुसरा नानासाहेब पेशवा 2 राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे बख्त खान बेगम हजरत महल कुंवरसिंघ |
इंग्रजी सेनाधिकारी
|
१० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरू झालेले बंड २० जून १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले व लागोलाग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत बसलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले व ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यास हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. अवधचा मोठा भुभाग देखील शिपायांच्या ताब्याखाली आला व ब्रिटिश सैन्य घाबरले. तरी कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूर व दिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. पण झाशी, अवध आणि लखनऊतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खुप वेळ लागला.
१ नोव्हेंबर १८५८ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटिश संसदेने संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी राज संपुष्टात आले.