शाहू महाराज
भारतीय समाजसुधारक आणि कोल्हापूरचे छत्रपती / From Wikipedia, the free encyclopedia
शाहू भोसले (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी[1] प्रसिद्ध, हे मराठ्यांच्या भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे (राज्यकाळ १८९४ - १९००) आणि पहिले छत्रपती (१९००-१९२२) होते.[2][3][4]
लोकराजा क्षत्रियकुलवतंस श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज आबासाहेब | ||
---|---|---|
छत्रपती, राजर्षी , लोकराजा | ||
शाहू महाराजांचे छायाचित्र | ||
मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान | ||
अधिकारकाळ | इ.स. १८८४ - इ.स. १९२२ | |
अधिकारारोहण | एप्रिल २, इ.स. १८९४ | |
राज्यव्याप्ती | कोल्हापूर जिल्हा | |
राजधानी | कोल्हापूर | |
पूर्ण नाव | छत्रपती शाहू महाराज भोसले | |
जन्म | जून २६, इ.स. १८७४ | |
लक्ष्मी-विलास राजवाडा, कसबा बावडा , कोल्हापूर | ||
मृत्यू | मे ६, इ.स. १९२२ | |
मुंबई | ||
पूर्वाधिकारी | छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी) | |
' | राजाराम ३ | |
उत्तराधिकारी | छत्रपती राजाराम भोसले | |
वडील | आबासाहेब घाटगे. ... . | |
आई | राधाबाई .. . | |
पत्नी | महाराणी लक्ष्मीबाई भोसले | |
राजघराणे | घाटगे,भोसले | |
राजब्रीदवाक्य | जय भवानी |
राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.