भारतातील उमायद मोहिमा
From Wikipedia, the free encyclopedia
इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय राजे व उमायद खिलाफत यांच्यात सिंधू नदीच्या पूर्वेला मोठ्या लढाया झाल्या.
हा लेख ६ मे, २०१७ रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. | २०१७चे इतर उदयोन्मुख लेख |
दिनांक | इ.स .७१२ ते इ.स. ७४० |
---|---|
स्थान | राजस्थान |
परिणती | निर्णायक भारतीय विजय |
प्रादेशिक बदल | उमायद राज्यविस्तार सिंधपर्यंत रोखला. |
युद्धमान पक्ष | |
---|---|
गुर्जर प्रतिहार साम्राज्य चालुक्य साम्राज्य |
उमायद खिलाफत |
सेनापती | |
नागभट्ट पहिला विक्रमादित्य दुसरा बाप्पा रावळ |
जुनायद इब्न अल्-रहमान अल्-मुरी तमिम इब्न झैद अल्-उत्बी अल्-हकम इब्न अवाना
|
इ.स. ७१२ मध्ये सिंध राज्य जिंकल्यावर अरबांनी सिंधूच्या आणखी पूर्वेकडे राज्यविस्तार करण्याचे प्रयत्न केले. इ.स. ७२४ ते ८१० च्या दरम्यान उत्तरेकडील गुर्जर-प्रतिहार सम्राट नागभट्ट पहिला, दक्षिणेकडील चालुक्य सम्राट विक्रमादित्य दुसरा व इतर लहान भारतीय राज्ये यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या अरबांशी संघर्ष झाला. उत्तरेकडे सम्राट नागभट्टाने माळव्यावर चाल करून येणाऱ्या महत्त्वाच्या अरब मोहिमेचा पराभव केला तर दक्षिणेकडून विक्रमादित्याने आपला सेनानी पुलकेशी याला पाठवले. पुलकेशीने गुजरातमध्ये अरबांचा पराभव केला. इ.स. ७७६ मध्ये सैंधव नाविक दलाने अरबांच्या नाविक मोहिमेचा पराभव केला.
या पराभवांमुळे अरबांचा पूर्वेकडील राज्यविस्तार संपुष्टात आला व नंतर सिंधमध्येच अरब राज्यकर्त्यांचा पाडाव होऊन तेथे स्थानिक मुस्लिम राजपूत वंश (सूम्रा व समा) स्थापन झाले.