दहा लाखाहून जास्त लोकसंख्या असलेली भारतातील शहरे
विकिमीडिया यादी लेख / From Wikipedia, the free encyclopedia
भारत हा दक्षिण आशियातील एक देश आहे. भौगोलिक क्षेत्रानुसार हा सातवा क्रमांकाचा देश आहे.१.२ अब्ज लोकसंख्या असलेला हा लोकसंख्येप्रमाणे दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्या आहे. भारतामध्ये अठ्ठावीस राज्ये आणि नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत.[1] येथे जगातील १७.५% लोकसंख्या राहते .[2]
ब्रिटिश भारतातील पहिली लोकसंख्या जनगणना १८७२ मध्ये झाली. १९५१ पासून दर दहा वर्षांनी भारतात जनगणना केली जाते.[3] भारताच्या जनगणना गृह मंत्रालयांतर्गत भारताचे कुलसचिव (???) व जनगणना आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत केली जाते आणि हे काम केंद्र सरकार करीत असलेल्या सर्वात मोठ्या प्रशासकीय कामांपैकी एक आहे.[4]
नवीनतम उपलब्ध आकडेवारी ही २०११ च्या खानेसुमारीवर आधारित आहे.[5] भारतात ६,४१,००० गावे आहेत आणि एकूण लोकसंख्येपैकी ७२.२ टक्के लोकसंख्या या ग्रामीण भागात आहे. त्यापैकी १,४५,००० खेड्यांमध्ये प्रत्येकी ५०० ते ९९९ लोक राहतात; १,३०,००० खेड्यांची लोकसंख्या दर खेड्यामागे १००० ते १९९९ च्या दरम्यान आहे; आणि १,२८,००० खेड्यांची लोकसंख्या प्रत्येकी २०० ते ४९९ आहे. ३,९६१ गावे अशी आहेत की ज्यांची लोकसंख्या गावी १०,००० व्यक्ती किंवा त्यांहून अधिक आहे [2] भारताची २७.८ टक्के शहरी लोकसंख्या ५,१०० पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि ३८०पेक्षा जास्त समपिण्डित(???) शहरांमध्ये राहते.[6] १९९१-२००१ च्या दशकात लोकांनी ग्रामीण भागांतून मुख्य शहरांत स्थलांतर केल्याने शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढली.[7][8] १९९१ ते २००१ या काळात शहरी भागात राहणाऱ्या भारतीयांची संख्या ३१.२% वाढली आहे. [9] तरीही, २००१ मध्ये, ७०% पेक्षा जास्त लोक ग्रामीण भागांत राहात होते. [10] [11] २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात दहा लाखाहून जास्त लोकसंख्या असलेली ४६ शहरे आहेत आणि मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे १ कोटीहून अधिक लोक राहतात.
२०११ पर्यंत दशलक्ष किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेले भारतात ५३ संपिण्डित(???) शहरे आहेत ज्यात २००१ मध्ये ३५ होते. (असंबद्ध वाक्य!) भारताच्या शहरी लोकसंख्येपैकी सुमारे ४३ टक्के लोक या शहरांमध्ये राहतात.[12][13][14]