कोल्हापूर
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर / From Wikipedia, the free encyclopedia
कोल्हापूर हा महाराष्ट्राचा महत्वाचा जिल्हा आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी व कर्नाटक बॉर्डरला लागून असल्याने काही भागात कन्नड बोलली जाते. येथील श्री करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन आणि भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे. पंचगंगा येथील प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, इचलकरंजी जयसिंगपूर कुरुंदवाड नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य शाहूवाडी तसेच धार्मिक क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील जोतिबा खोची येथील भैरवनाथ मंदिर इत्यादी प्रमुख ठिकाणे आहेत. कोल्हापूरला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची गादी म्हणूनही ओळखले जाते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला.
?कोल्हापूर महाराष्ट्र • भारत | |
— नगर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
६६.८२ चौ. किमी • ५६९ मी |
जिल्हा | कोल्हापूर जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
३८,७६,००१ (महाराष्ट्रात ९वा) (२०११) • ५०४/किमी२ |
महापौर | |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४१६००१ • +०२३१ • MH-09 |
संकेतस्थळ: कोल्हापूर महानगरपालिका संकेतस्थळ | |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |